लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
जन्म :- २३ जुलै १८५६
मृत्यु :- १ ऑगस्ट १९२०
लोकमान्य टिळक म्हंटले कि, पहिले आठवते ते त्यांचे वाक्य. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणारच."
टिळकांचा जन्म रत्नागिरी मधील "मधल्या आळीत" एका मध्यमवर्गीय "मराठी चित्पावन ब्राम्हण" कुटुंबात झाला. पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये १८७७ साली त्यांचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण झाला. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायल सुरुवात केली. व नंतर त्यानी वृत्त्पत्रकरित चालु केली.
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा हि दोन वृत्तपत्रे चालु केली. त्यात त्यांना गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर आणि इतर सहकार्यांची मदत मिळाली.
वृत्तपत्रात सरकारविरोधी जहाल लिखाणामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्य विरुद्ध गुन्ह दाखल केला व मंडाले (बर्मा) तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा दिली.
लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी "सार्वजनिक गणेशोत्सव" व "सार्वजनिक शिवजयंती" हे उत्सव सुरु केले.
* लोकमान्य बाळ गंगाधर टिळक