भाव माझ्या मनातला तुजला कधी कळेल का?
सूर प्रीतीचा नवा सांग कधी जुळेल का?
अ.वि.दाते.
----------------------------------------------------------------------------------
प्रेम म्हणजे ईश्वराची माया झाडाची शीतल छाया,
उपमा अन्य न सुचे मजला तुझ्या माझ्या प्रेमा या.
अ.वि.दाते.
----------------------------------------------------------------------------------
प्रेम कसं व्हावं कळीनं जसं उमलावं,
पण हे सारं कही अगदी नकळत घडावं.
अ.वि.दाते.
----------------------------------------------------------------------------------
सामुद्राचा शांत किनारा, शांत सुन्दर नदी काठ,
आशा ठिकाणी सतत पडावी, तुझी नि माझी गाठ.
अ.वि.दाते.
----------------------------------------------------------------------------------
वैशाखातील सूर्याचे ऊन, वर्षा रुतूतिल कोकिळेचि धून,
रुतू एकही जात नाही, तुझी आठवण आल्यावाचून.
अ.वि.दाते.
----------------------------------------------------------------------------------
आयुष्यात माणसाला,
बरंच काही मिळतं,
बरंच काही हरवतं,
जेंव्हा प्रेम होतं.
अ.वि.दाते.
चारोळ्या
Posted by सुधिर जनार्दन गोसावी
Labels: Marathi kavita, चारोळ्या / Comments: (0)
तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!
माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!
तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!
सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!
शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!
- सुह्र्द पोतदार, पुणे.